Slider Image
सूचना
📢 ग्रामपंचायत चांदोरी आपले सहर्ष स्वागत करत आहे.    📢 माझी वसुंधरा अभियान २.० मध्ये राज्यस्तरीय ३ रा पुरस्कार प्राप्त ग्रामपालिका     📢 माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये नाशिक विभागस्तरीय ३ रा पुरस्कार प्राप्त ग्रामपालिका     📢 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावामध्ये  राबवायचे नाविन्यपूर्ण उपक्रम.... १) सुजान ग्रामस्थ   ग्रामपंचायतचे जे खातेदार शंभर टक्के कर भरणा मुदतीत करतील त्यांना एक एप्रिल रोजी त्यांच्या घराचा नमुना नंबर आठ चा उतारा घरपोच मिळेल  २) माहेरचा आहेर  ज्या भगिनी 1 डिसेंबर नंतर बाळंतीण होतील त्यांच्यासाठी ग्रामपंचायत कडून एक फळझाड व पौष्टिक आहाराचे एक पॉकेट भेट म्हणून देणार  ३) प्लास्टिक बंदी  यासाठी शाळेतील विद्यार्थी गावातील ग्रामस्थांना पत्र लिहिणार  ४) माहेरचा कट्टा  या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत गावातील महिलांना एक सुरक्षित ठिकाणी सर्व सुविधायुक्त खोली तयार करण्यात येईल त्या त्या त्यांच्या घरातील कामकाज आवरल्यानंतर येथील तेथे करमणूक करण्यासाठी व आराम करण्यासाठी सुविधा असतील त्यात त्यांना गर्भसंस्कार व गर्भवाडी संदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल व मनमोकळ करण्यासाठी त्यांच्या मैत्रिणींबरोबर वेळ घालवता येईल  ५) विशेष व्यक्ती -विशेष भेट  गावात एखाद्याचा वाढदिवस असल्यास किंवा व्यक्ती मृत पावल्यास त्या निमित्त ग्रामपंचायतकडे वस्तू रुपात भेट देण्यात येईल किंवा गावातील एखादा गरजू विद्यार्थी दत्तक देण्यात येईल  ६) सोलार ग्राम ग्रामपंचायतीला असलेल्या सौर पॅनलवरून गावातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल व त्याद्वारे इंधन बचत करून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल  ७) पक्षी पार्क  गावात नाना नानी पार्क या कन्सेप्ट प्रमाणेच पक्षांसाठी पार्क तयार करणे व तेथे त्यांना दाना व पाणी याची सुविधा पुरविणे ) ८) स्क्रीन मार्गदर्शन  गावात मोठे स्क्रीन लावून त्यात गावात होणाऱ्या चांगल्या घटना स्क्रीनवर दाखवणे तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा गावातील प्रत्येकनागरिकांना देणे ९) विशेष डायरी  गावात असणारे डॉक्टर मेडिकल फळ विक्रेते किराणा दुकानदार मेकॅनिकल विजतंत्री प्लंबर गवंडी व्याख्याते गाव पातळीवरील स्थानिक कर्मचारी अधिकारी लोकप्रतिनिधीइत्यादींचे फोन नंबर एकत्र करून त्याची पुस्तिका तयार करणे व ती.गावातील लोकांना उपलब्ध करून देणे १०) आठवण उद्यान    गावातील मृत व्यक्ती यांच्या आठवणीत,आठवण वृक्ष लावण्यात यावे व त्या उद्यानास आठवण उद्यान असे नाव द्यावे ११) इ चार्जिंग  ग्रामपंचायतीला असलेल्या सौर पॅनलवरून गावातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल व त्याद्वारे इंधन बचत करून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल  १२) शेतकरी मार्गदर्शन  शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजना स्क्रीन वर दाखवणे १३) बाल वृक्ष नवीन् बाळ जन्माला आले की एक झाड लावून संगोपन करणे  १४) स्वछ ग्राम स्वच्छ वॉर्ड स्पर्धा आयोजित करून ग्राम पातळीवर त्यांचा सन्मान करणे   १५) बडे ट्री वाढदिवसा दिवशी त्यांच्याकडून एक झाड लावून ते दत्तक देणे १६)  योगा डे आठवड्यातून एक दिवस योगा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा  १७) महिला आरोग्य  menopause बाबत महिलांचे आरोग्य तपासणी तसेच चर्चासत्र आयोजित करावे १८) महीला भवन  महिलांचा सहभाग तसेच त्यांचे मानसिक आरोग्य आणि भावना व्यक्त करण्यासाठी जागा असणे आवश्यक असते त्यासाठी आठवड्यातून एक दिवस सायंकाळी मनोरंजन व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात यावे   १९) बाळ कोपरा अंगणवाडीत लहान मुलांचे सातत्य टिकवण्यासाठी अंगणवाडीत बाळ कोपरा घेण्यात यावा २०) स्वावलंबी ग्राम गावात पिकणारा भाजीपाला  तसेच उत्सव काळात लागणाऱ्या वस्तू ह्या गावातच विक्री करण्यात याव्यात जेणेकरून आपल्या गावात चलन उपलब्ध होईल    २१) आयडिया ची कल्पना ग्रामसथाकडून काही नवीन कल्पना घेऊन नवीन वस्तूंची निर्मिती व त्यांचे प्रदर्शन  २२) पडीक विकास  गावात ठिकठिकाणी असणाऱ्या पडीक जागेत वृक्ष लावून किंवा शोभेची झाडे लावून सुशोभित करण्यात यावे  २३) आयुर्वेदिक ग्राम आपल्या गावातील पुढील पिढीसाठी आयुर्वेदिक वनस्पती औषधी झाडे यांची ओळख असावी यासाठी भारतीय प्रजातीची औषधी झाडे वनस्पती लागवड करण्यात  यावी तसेच त्यांचे महत्त्व काय आहे याबाबत Q R code बोर्ड लावण्यात यावा  २४) महिला मंच महिलांना व्यक्त होता येईल यासाठी त्यांचा गाव पातळीवर महिलांचा स्वतंत्र व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात यावा २५) महिला गौरव  बचत गटातील बऱ्याच महिला उत्कृष्ट उद्योग करतात तशा उद्योगिनींना सन्मानित करण्यात यावे जेणेकरून त्यांची यशोगाथा ऐकून बाकीच्या महिला उपकृत होतील तसेच स्थानिक वृत्तपत्रात त्याबाबत वार्ताणकण करावे   २६) सेंद्रिय ग्राम  शेती पद्धती याबाबत शेतकऱ्यांचे प्रशिक्षण तसेच चर्चासत्र घेण्यात यावे त्याचप्रमाणे पारंपारिक बियाणे साठवणूक करण्यात यावी  २७) अपारंपारिक ऊर्जा  वापर  करणे बाबत गावातील कुटुंबांना मार्गदर्शन करण्यात यावे तसेच जे कुटुंब 100% अपारंपारिक ऊर्जां वापर करत असेल त्यांचा सन्मान करण्यात यावा २८) इ लायब्ररी  डिजिटल लायब्ररी तयार करणे २९) सुगरण आरोग्यमय महिलांमध्ये प्रामुख्याने आढळून येणाऱ्या ॲनिमिया साठी रक्त तपासणी   ॲनिमिया मुक्त होण्यासाठी घरात उपलब्ध होणारे पदार्थ त्याच्या पाककृती याबाबत मार्गदर्शन करावे  ३०) बाल सवयी लहान मुले यांच्यात लहानपणी स्वच्छतेच्या सवयी रुजवण्यासाठी त्यांना बालगीते तसेच खेळाच्या माध्यमातून स्वच्छतेच्या सवयी लावाव्यात  ३१) महिला सुरक्षा   महिलांमध्ये मुलीं मध्ये सुरक्षित आयुष्य जगण्यासाठी त्यांना सेल्फ डिफेन्स साठी प्रशिक्षण कराटे वर्ग घेणे आवश्यक आहे   ३२) सुशिक्षित बेरोजगार  तरुण तरुणी यांनी व्यवसाय करावा यासाठी प्रशिक्षण आयोजित करणे ३३) प्लास्टिक बंदी   

ग्रामपंचायत सेवा

महाराष्ट्र राज्य प्रशासन

श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस
श्री. एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
श्री. अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. अजित पवार
श्री. जयकुमार गोरे
मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. जयकुमार गोरे
श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. योगेश कदम
श्री. एकनाथ डवले
प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. एकनाथ डवले

जिल्हा परिषद / पंचायत समिती प्रशासन

श्री.ओमकार पवार साहेब
माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी (भा.प्र.से.)
श्री.ओमकार पवार साहेब
डॉ. वर्षा फडोळ
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) जि.प
डॉ. वर्षा फडोळ
नम्रता चंद्रकांत जगताप
माननीय गटविकास अधिकारी (उ.श्रे.)
नम्रता चंद्रकांत जगताप
श्री सुनील पाटील
सहाय्यक गटविकास अधिकारी
श्री सुनील पाटील

गावाविषयी माहिती

चांदोरी  हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील प्रभू श्री.राम  यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे.चांदोरी गावाचे ऐतिहासिक महत्त्व चांदोरी हे गाव नाशिकपासून नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर पंचवीस किलोमीटरवर आहे. गावात शिरताना गावचा बाजार लागतो. मात्र, ती गजबज टर्ले-जगताप वाड्यापासून पुन्हा शांत होते. टर्ले-जगताप वाडा आता नाही, परंतु ते ठिकाण लोकांच्या मनी पक्के बसले आहे. किंबहुना चांदोरी प्रसिद्ध आहे ते ऐतिहासिक वाड्यांमुळे.गावाला तसा इतिहासही आहे. गावात नव्या इमारती दिसतात, पण त्या जुन्या घरांसमोर खुज्या वाटतात. महादेव भट हिंगणे हे पेशव्यांचे नाशिक येथील क्षेत्रोपाध्ये होते. पेशवे बाळाजी विश्वनाथ हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान यांनी महादेव भट हिंगणे यांना 1718 मध्ये दिल्लीस नेले. पेशवे दिल्लीहून परत आले तेव्हा त्यांनी भरवशाचा माणूस म्हणून महादेव भट हिंगणे यांची वकील म्हणून दिल्लीच्या वकिलातीवर नेमणूक केली.तेव्हापासून नाशिकचे हिंगणे राजकारणात मान्यता पावले. दिल्ली व मराठी माणूस यांचे नाते अतूट आहे. त्या संबंधांचा ऐतिहासिक मागोवा घेतला तर मराठी वकिलातीचे महादेव भट यांच्या रूपाने पहिले पाऊल पडले होते. त्यांना पेशव्यांचे पहिले कारभारी असेही म्हटले जाते. पेशव्यांनी महादेव भट यांच्या एकनिष्ठ कारभारावर खूश होऊन त्यांना मौजे चांदोरी, खेरवाडी, नागपूर व धागूर ही गावे इनाम म्हणून 1730 मध्ये दिली. पेशवाईत सरदार महादेवभट हिंगणे, देवराम महादेव हिंगणे व बापूजी हिंगणे यांची कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण आहे. बापू हिंगणे हे पानिपतच्या लढाईत नानासाहेब पेशव्यांबरोबर होते.

गणेश हिंगणे यांनी छपन्न खोल्यांचा प्रशस्त वाडा चांदोरीत 1762 मध्ये बांधला. हिंगणे यांचे काही वाडे झाशी येथे व नाशिकमधील भद्रकालीतही आहेत. हिंगणे यांच्याकडे दहा हजार एकर भूभागाची जहागिरी 1953 पर्यंत होती. ब्रिटिशांनी सरदार राजेबहादूर, सरदार विंचूरकर व सरदार हिंगणे यांचीच सरदारकी नाशिक जिल्ह्यात मंजूर केली होती. चांदोरी परिसरात जमीन व महसुल यांची मालकी ही हिंगणे यांच्याकडेच होती. त्यांच्या पराक्रमांची साक्ष देणारा चांदोरीतील हिंगणे वाडा तो इतिहास उलगडून सांगतो. हिंगणे वाड्यातील अनेक वस्तू रशिया-ब्रिटनमधील वस्तूसंग्रहालयात आहेत.

चांदोरीतील हिंगण्यांचा वाडा, मठकरी वाडा, हिंगमिरे वाडा पाहण्यासारखे आहेत. त्याखेरीज टर्ले वाडा जमीनदोस्त झाला आहे. टर्ले म्हणजे मूळचे जगताप. त्यांच्याबाबत आख्यायिका अशी सांगितली जाते, की जगतापांच्या घरी मूल जगत नसल्याने त्यांनी वंश जगावा म्हणून खेडभैरव (तालुका इगतपुरी) येथे बकऱ्याचा बळी देऊ असा नवस केला होता. तेव्हापासून टर्ले-जगतापांच्या सर्व पिढ्या तो नवस फेडण्याची परंपरा पाळतात. गावातून वाहणाऱ्या गोदावरीचे पात्र चंद्रकोरीसारखे असल्याने गावाला चंद्रावती असे नाव पडले अन्‌ पुढे झाले चांदोरी म्हणे!

गावातील बुद्धविहार, लाकडात नक्षीकाम असलेली चावडी वैशिष्ट्यपूर्ण आहे. बाबासाहेब आंबेडकर त्या इमारतीत येऊन गेल्याचे ग्रामस्थ सांगतात. मठकरी वाड्यातील दक्षिणाभिमुख राममंदिर व तेथील रामजन्मोत्सव महाराष्ट्रात आगळेवेगळे आहेत. राम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्ती कायम अधांतरी (चौपाळ्यावर) असतात.वाड्यातील शंकराची पिंड स्वयंभू आहे. पूर्व-पश्चितम पिंडी हा त्या मंदिराचा विशेष आहे. रामाने मृगवेध त्या मंदिरातूनच घेतला; तसेच, रामाचे पाऊल तेथे उमटल्याचा दाखला अशा पुराण कथा मंदिराशी जोडल्या गेल्या आहेत. रामनवमीला तेथे मोठी मिरवणूक असते. मंदिरात काचेवर रंगवलेली दशावताराची जुनी चित्रे आहेत. मठकरी वाड्यातील ऑस्ट्रियन बनावटीच्या तीनशे वर्षापूर्वींच्या काचेच्या हंड्या दुर्मीळ आहेत.

चांदोरी चिरेबंदी वाड्यांसाठी ओळखले जाते. तसेच, ते महाराष्ट्रात फक्त चांदोरी (व त्र्यंबकेश्वबर) येथेच इंद्राच्या एकमेव मंदिरासारख्या वैशिष्ट्यपूर्ण मं‌दिरांसाठीही ओळखले जाते. मठकरी वाड्यातील राममंदिराजवळ 1852 मध्ये बांधलेले दत्तमंदिर आहे. वाड्यामागील उजव्या सोंडेच्या गणेशाचे मंदिरही जागरूत समजले जाते. सरदार हिंगणे यांच्या वाड्यातील देवी ही कोल्हापूरच्या देवीचे अधिष्ठान मानले जाते. गोदेच्या कुशीत बुडालेली मंदिरे हे चांदोरीचे वैशिष्ट्य आहे. पाण्यात राहूनही ती हेमाडपंती मंदिरे सुस्थितीत आहेत. शंकराची ती बारा मंदिरे आहेत. त्यामुळे त्यांना बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती मानली जातात. पंचमुखी महादेवाचे दुर्मीळ मंदिर हेही विशेष होय. ती मंदिरे अहिल्याबाई होळकर यांनी बांधल्याचे म्हटले जाते. नदिपात्रात अनेक मूर्ती बेवारसरीत्या पडलेल्या पाहण्यास मिळतात. त्या मूर्तींचे संकलन करून गावात वस्तुसंग्रहालय उभारल्यास तो ऐतिहासिक वारसा जपला जाऊ शकतो. नदीकाठावरील खंडेरायाचे मंदिर प्रतिजेजुरी समजली जाते. जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतल्यानंतर तेथील मंदिरात आल्यावरच नवस फेडला जातो अशी प्रथा असल्याने तेथे नेहमी वर्दळ असते. खंडोबा, भैरवनाथ व सप्तशृंगी या देवतांच्या गावातून निघणाऱ्या रथयात्राही पाहण्यासारख्या असतात. गावात बोहाड्याची परंपरा होती, मात्र ती कालांतराने बंद पडली. प्रसिद्ध नारायण महाराजांची संजीवन समाधी नदीकिनारी आहे. चांदोरीत अनेक संत-महात्मे येऊन गेल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावातील वाड्यासारखे दिसणारे विठ्ठल मंदिरही वैशिष्ट्यपूर्ण आहे. तेथे विठ्ठल-रूक्मिणी व राईबाई यांची मूर्ती पाहण्यास मिळते. तेथील भिंतीवर चित्र असून त्या मंदिराची देखभाल भन्नसाळी कुटुंब करते.

ऐतिहासिक पार्श्वभूमी अन् दिल्लीपर्यंत पराक्रम गाजवणाऱ्या माणसांची तेजस्वी चांदोरीची ओळख लोककलावंत माधवराव गायकवाड यांच्याशिवाय अपुरी ठरेल. माधवराव गायकवाडांचे नाव आजही तमाशा क्षेत्रात आदराने आणि गुरूस्थानी घेतले जाते. एकदा दादासाहेब फाळके आपल्या मॉरिस गाडीतून माधवराव गायकवाडांना त्यांनी चित्रपटात काम करावे म्हणून चांदोरीत आले होते. माधवरावांनी मात्र तमाशाच आपली जान आणि शान असल्याचे सांगत फाळकेंना नकार दिला होता. त्यांनी लोककलावंत म्हणून केलेली कामगिरी अजरामर ठरली. त्यांचा 1987 मध्ये मृत्यू झाला. त्यांचा मुलगा प्रताप गायकवाड वडिलांची परंपरा ‘तमाशा कलावंत’ म्हणून पुढे नेत आहे. चांदोरी नावामागील एक वलय म्हणजे मल्हारराव होळकरांच्या चांदवड टांकसाळीत चांदीचा रुपया तयार होत असे. त्याला ‘चांदोरी रुपया’ म्हटले जायचे.त्याचा चांदोरीशी थेट काही संबंध नसला तरी पराक्रम आणि कामगिरीने लखलखणाऱ्या चांदोरीची भुरळ अनेकांवर पडत असते हे मात्र नक्की

सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे १४५९९ आहे.गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ८,अंगणवाडी केंद्रे १४.माध्यमिक शाळा १,कनिष्ट महाविद्यालय २,कॉलेज १ व व्यायामशाळा १,सभामंडप-३,PHC उपकेंद्र १, गावातील समाज मंदिर/सामाजिक सभागृह/मंगल कार्यालय :-समाज मंदिर १,मंगल कार्यालय ८,अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. पुरातन व हेमाडपंथी मंदिरे,सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण,सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील उपलब्ध आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस, द्राक्ष, कांदा,सोयाबीन व मका ही प्रमुख पिके घेतली जातात.द्राक्ष  ऊस कांदा या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते,तसेच दुग्ध व्यवसाय करतात.

चांदोरी ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत.घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुलचा  लाभ मिळाला आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत चांदोरी गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे.जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे.माझी वसुंधरा अभियान ०.२ व ०.४ मध्ये  चांदोरी विशेष गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासनमार्फत प्राप्त झालेला आहे.स्वच्छता अभियान पुरस्कारही जिल्हा व तालुका  पातळीवर मिळाला आहे.

ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व १८ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

चांदोरी गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.


लोकसंख्या आकडेवारी


2284
12594
6606
5988
Logo 1
Logo 2
Logo 4
Logo 5
Logo 6
Logo 7